दिल्ली
टीम इंडिया पुढील आगस्ट महिन्यात झिम्बाब्वे दौऱ्यावर जात आहे. तिथे त्याला 3 वनडे खेळायचे आहेत. 18 ऑगस्टपासून हा दौरा सुरू होणार आहे. सर्व सामने हरारे स्पोर्ट्स क्लब येथे होणार आहेत. त्यामुळे क्रीडा प्रेमींना उत्सुकता वाढली आहे मात्र, या दौऱ्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. पण, झिम्बाब्वे क्रिकेटचे तांत्रिक संचालक लालचंद राजपूत यांनी याला दुजोरा दिला आहे.
टीम इंडिया आगस्ट महिन्यात झीमबोंबे दोर्यावर जाणार असून हा भारतीय संघ 15 ऑगस्टला हरारेला पोहोचेल. हा दौरा ICC ODI सुपर सिरीजचा भाग आहे. हे महत्त्वाचे आहे कारण, पुढील वर्षी एकदिवसीय विश्वचषक होणार आहे. त्याचे गुण पुढील वर्षीच्या एकदिवसीय विश्वचषकासाठी पात्रतेसाठी मोजले जातील. भारत विश्वचषकासाठी आधीच पात्र झाला असला तरी.
आम्हाला भारताचे पाहुणचार करण्याची संधी मिळाल्याने आम्हाला खूप आनंद होत आहे आणि आम्ही स्पर्धात्मक आणि संस्मरणीय मालिकेसाठी उत्सुक आहोत,” झिम्बाब्वे बोर्डाचे तांत्रिक संचालक म्हणाले.



