अहमदनगर (प्रशांत बाफना)-: असलम कादरी – गेवराई तालुक्यातील चकलंबा पोलिसा कडून पत्रकारास मारहाण झाल्याची घटना दि.१५ऑगस्ट २०२४ गुरूवार रोजी सायंकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली आहे.या घटनेची अधिक माहिती अशी की, चकलंबा पोलिस ठाण्या समोर पत्रकार आस्लम कादरी व त्यांच्या भाऊ शोहेब कादरी (रा.चकलंबा) हे त्यांच्या स्वत:दुकानासमोर उभे असतांना त्या दोघांनाही पाहुन येथील पि एस आय आनंता तागंडे यांनी पोलिस ठाण्यातून येऊन त्या दोघां भावांना बेदम मारहाण सुरू केली मारहाण करत असतांना पत्रकार असलम कादरी याला पि.एस.आय. आनंता तांगडे म्हणत होते की,तू खूप मोठा पत्रकार झालाय का मी धरलेल्या वाळूच्या गाड्या जवळ येऊन विडियो काढून मला विचार पूस करतोस आम्ही काय येथे फुकट आलोय का आम्ही पण येथे नोटा मोजून आलोय आणि त्या नोटा का तुझ्या बाप देणार का असे म्हणत पत्रकार आसलम कादरी व शोहेब कादरी यांना मारहाण करण्यात आली. हे बीड जिल्हयातील चकलंबा पोलिस ठाणे कायम वादाच्या भोवऱ्यात असतं
बीड जिल्ह्यातील सर्वाधिक अवैध धंदे या पोलिस ठाण्याच्या हद्दीत चालु आहेत.अवैध वाळू उपसा,मटका,अवैध पत्ते, एक ना अनेक अवैध धंदे या पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असुन पोलिस या धंद्याकडे आर्थिक देवाण घेवाणीतुन जाणिवपूर्वक दुर्लक्ष करतात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.कारण या पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे जोरात सुरू आहेत आणि पोलिस या कडे लक्ष देत नाहीत
आज जो प्रकार चकलंबा पोलिस ठाण्यात घडला तो पाहता पोलिस हे फक्त पत्रकार व सर्व सामान्य माणसाला दबाव टाकण्या साठी आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कारण पि.एस.आय. आनंता तागंडे याने पत्रकार असलम कादरी याला पोलीस ठाण्यसमोर मारले.आणि नंतर पत्रकार असलम कादरी यांनी त्या पोलिस कर्मचारी तागंडे याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यासाठी जात असताना देखील त्यांना मारहाण केली एकीकडे चकलंबा पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात चोऱ्या होत आहेत तर त्या चोरट्यांना पकडायचे सोडून तुम्ही सर्व सामान्य माणसाला मारहाण करत आहेत वा रे वा आनंता तागंडे ,हे पोलीस ठाणे म्हणजे, हम करे तो कायदा असं नसतं
..
पोलिस निरीक्षक एकशिंगे साहेब तुम्ही ठाण्यात असतांना देखिल गुन्हा का नोंद केला नाह
पत्रकार असलम कादरी व शोहेब कादरी यांना मारहाण झाल्यानंतर ते पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यासाठी आले त्या दरम्यान देखील अनंता तांगडे यानी त्या दोघांना मारहाण केली .
हे दोघे एकशिंगे साहेब आमची फिर्याद घ्या असे सांगत होते तुम्ही त्यांची फिर्याद का घेतली नाही?








