अमिर शेख /फलटण
काँग्रेसचे युथ आयडॉल राहुलजी गांधींच्या विचाराने आगामी गिरवी ग्रामपंचायत निवडणूक काँग्रेस पक्ष पूर्ण ताकतीने लढणार असल्याचे प्रतिपादन युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष श्री. अजिंक्य कदम यांनी केले आहे आज देशात संविधान बचाव,बेरोजगारी, महागाई,गावातील दहशतवाद,गावातील जाती-धर्मातील भांडणे,गावाचा विकास,, गावातील बहुजन वर्गातील युवकांना रोजगार निर्मिती उपलब्ध करून गावातील तरुणांना बळकट करण्यास काँग्रेस पक्ष प्रयत्न करणार आहे,गावच्या निवडणुकीत युवकांना व्यसनाच्या मार्गी लावणारे दारू,मटण जेवणे वगैरे दिली जाणार नाहीत छ.शिवाजी महाराज, छ. शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर,म.जोतिबा फुले,क्रांतिवीर उमाजी नाईक,आण्णाभाऊ साठे या महापुरुषांची शिकवण घेऊन गावातील घराणेशाहीतुन गुलामगिरी मुक्त व दहशतमुक्त गिरवी करण्याचं प्रयन्त केला जाईल आणि गावातील थोर काँग्रेस विचाराचे नेते आ.चिमणराव कदम,रामाराव आण्णा,शामराव आप्पा,दत्तू भाऊ,बुवा काका,सदाशिव आप्पा,रामभाऊ तात्या,बबन काका,बुवासाहेब आप्पा,बाबुराव काका यांचा गावातील काँग्रेसच्या विचाराचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि तालुक्यात गिरवी गाव पुन्हा आघाडीवर आणण्याकरिता गावातील युवक निवडणूकीत उतरणार असून फलटण तालुका काँग्रेस कमिटीच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी अच्युतराव दादा खलाटे डॉ.सचिन सूर्यवंशी बेडके , महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस फलटण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी बेडके अध्यक्ष ,कार्याध्यक्ष अमिरभाई शेख फलटण शहर काँग्रेसचे अध्यक्ष श्री.पंकज पवार ,सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस गंगाराम रणदिवे यांच्याठ मार्गदर्शनाखाली आणि गांवातील सर्व ज्येष्ठ मंडळी व युवकांच्या सहकार्याने गिरवी ग्रामपंचायतची निवडणूक लढवली जाणार आहे असे श्री. अजिंक्य कदम यांनी सांगीतले







