टोकाईच्या सभेत सभासदांचा आक्रमक पवित्रा
वसमत (इसाक पठाण)
ऊसाच्या एफ आर पी ची उर्वरित रक्कम दिल्याशिवाय कारखाना सुरू करू नका असा आक्रमक पवित्रा घेत सज्जड दम टोकाईच्या सभेत शेतकऱ्यांनी दिल्याने एकच खळबळ उडाली शेवटी आक्टोबर अखेर 500 रुपये देतो असे आश्वासन अध्यक्षांनी दिले.
वसमत तालुक्यातील टोकाई सहकारी साखर कारखान्याची 22 वी आधी मंडळाची सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता कारखाना साइटवर आयोजित करण्यात आली होती या सभेला कारखान्याचे सभासद ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
या सभेत एफ आर पी चा मुद्दा प्रचंड गाजला कारखान्याने मागच्या वर्षीचे ऊसाची एफ आर पी ची रक्कम दिली नाही त्यामुळे सभासद चांगलेच आक्रमक झाले होते कुरुंदा येथील एका शेतकऱ्याने तर हातात पेट्रोलची बाटली आणली व एफ आर पी ची रक्कम द्या नसता जाळून घेईन अशी धमकी दिल्याने काही वेळ वातावरण तणावाचे बनले होते या सभेत भाजपाचे तालुकाध्यक्ष खोबराजी नरवाडे, कुरुद्याचे सरपंच राजेश इंगोले,पि आर देशमुख, राजाराम खराटे आदींनी प्रश्नांचा भडीमार करत कारखान्याचे अध्यक्ष एडवोकेट शिवाजीराव जाधव यांना कोंडीत पकडले एफ आर पी ची रक्कम दिल्याशिवाय कारखाना सुरू करू नका सभासदांच्या शेअर्स ची वाढीव रक्कम घेऊ नका असे सांगितले.
यावेळी कारखान्याचे अध्यक्ष एडवोकेट शिवाजीराव जाधव यांनी सांगितले की ऊस उत्पादक शेतकरी सभासदांना न्याय दिला जाईल एफ आर पी ची रक्कम ऑक्टोबर अखेर पाचशे रुपये दिले जातील व उर्वरित रक्कम लवकरच देणार आहोत शेतकऱ्यांनीही आपला ऊस टोकाई कारखान्याला द्यावा हा शेतकऱ्यांचा कारखाना आहे असे आवाहन उपस्थित सभासदांना त्यांनी केले सभेतील सर्व ठराव मंजूर करण्यात आले यावेळी कारखान्याचे ज्येष्ठ संचालक माजी आमदार मुंजाजीराव जाधव,अड रणधीर तेलगोटे, शिवाजीराव इंगोले, मनोज कन्नेवार ,सुनील बागल, रावसाहेब कराळे ,जगदेवराव साळुंखे, खोबराजी नरवाडे ,साहेबराव पतंगे, गजानन जाधव ,देवानंद नरवाडे, विश्वनाथ जमरे , तज्ज्ञ संचालक विठ्ठलराव भोसले, कुमार वारे, प्रभारी कार्यकारी संचालक केशव मालेगावकर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद खराटे यांनी तर प्रस्तावना संचालक विलासराव नांदरे यांनी केले शेवटी संचालक शिवाजीराव सवंडकर यांनी आभार मानले








