प्रतिनिधी | बदनापूर
बदनापूर तालुक्यातील अंबडगावातील अवैध दारु विक्री बंदीसाठी महिला आणि पुरुषांनी जालना पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच ठिय्या देत आंदोलन केले असता कारवाईचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
बदनापूर तालुक्यातील अंबडगावमध्ये तीन ते चार जण अवैध दारुविक्रीचा व्यवसाय करतात. या दारुमुळं चार जणांचे प्राण गेले असून अल्पवीन मुलंही व्यसनाधीन होत चाललीये. त्यामुळं दारु विक्री बंद करण्यात यावी यासाठी ग्रामस्थांनी बदनापूर पोलिसांना अनेक निवेदनं दिली. मात्र त्यांनी कोणतिच कारवाई केली नाही. त्यामुळं गावातील महिला आणि पुरुषांनी आज थेट जालना जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गाठत ठिय्या दिलाय.
सध्या जालना जिल्हा हा चर्चेचा विषय ठरला आहे. राज्यात बऱ्याच घडामोडी या जिल्ह्यातून सुरू झाल्या आहे, पण त्या कुठल्याही विषयाचा का असेना असाच एक विषय घेऊन शेकडो महिला चक्क पोलीस अधीक्षक कार्यालय जालना येथे आल्या व त्यांनी मागणी केली आहे की, जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील अंबडगाव येथे मागील बऱ्याच दिवसापासून गावातील काही नागरिक अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात गरज आहे. यासंदर्भात त्यांनी संबंधित पोलीस स्टेशनला वेळोवेळी निवेदने देऊन फोन करून प्रत्यक्षात भेटून मागणी केली की ही सुरू असलेली अवैध दारू विक्री बंद करा मात्र कुठलाही प्रतिसाद संबंधित पोलीस स्टेशनकडून न मिळाल्यामुळे आज चक्क या महिलांनी पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांचे दालन गाठत त्यांच्यापुढे तक्रारींचा पाढाच वाचला आहे.
यावेळी बोलताना या महिला म्हणाल्या की , आंबडगाव येथील पृथ्वीराज रामनाथ ज-हाड, रामनाथ शामराव ज-हाड, अनिल अण्णा खरात, शिवनाथ लक्ष्मण थोरात या व्यक्ती गावात अनधिकृतपणे दारूच्या दुकाना टाकून देशी-विदेशी विषारी दारू विकतात त्यामुळे त्यात चार जणांचे बळी गेले असून कित्येक जण दीर्घ आजाराने त्रस्त आहेत. याला सर्वस्वी कारण आहे गावात सुरू असलेली अवैध विषारी दारू विक्री ,आणि जा सुज्ञ नागरिकांनी यांच्या विरोधात आवाज उठवला त्यांच्यावर तलवारी घेऊन धावतात, अरेराईची भाषा करतात, अपशब्द वापरतात महिलांना सुद्धा अपशब्द वापरतात यासंदर्भात बदनापूर पोलीस स्टेशनला वेळोवेळी निवेदन दिले असून कुठलीही कारवाई झाली नाही त्यामुळे पोलीस अधीक्षक या अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करणार का यासाठीच या महिलांनी थेट आज पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकत दारू विक्री बंद करण्याची मागणी केली आहे.
यावेळी सदरील ईसमांवर जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने त्वरीत कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल असे अश्वासन पोलीस अधीक्षक यांनी दिले.आता जालना जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल या महिलांना न्याय मिळवून देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.









