बदनापूर
तालुक्यातील मांजारगाव येथे रात्री दोन गटात वाद झाल्याने परिस्थिती गंभीर बनल्याने पोलीस निरीक्षक मछिंद्र सुरवसे यांना माहिती मिळताच टीम सह मांजरगाव गाठले असता वीस ते पंचवीस जण मोटारसायकली सोडून पळून गेले असता पोलिसांनी सदर मोटारसायकली जप्त केल्या असून दोन गटातील तक्रारी वरून गुन्हे दाखल करण्यात आले आहे. रात्री सर्वत्र धार्मिक स्थळावरून वाद झाल्याच्या बातम्या सोशल मीडियावर प्रसारित झाल्या होत्या मात्र त्या चुकीच्या असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मछिंद्र सुरवसे यांनी दिली. सदर भाडणे शाळकरी मुलावरून झाल्याचे देखील सांगितले.
बदनापूर तालुक्यातील मांजरगाव येथे धार्मिक स्थळावरून दोन गटात वाद होऊन मारामारी झाल्याचे बातम्या ८ आगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता सर्वत्र पसरल्या व सोशल मीडियावर झडकू लागल्या दरम्यान बदनापूर पोलीस राहण्याचे पोलीस निरीक्षक मछिंद्र सुरवसे यांनी टीम सहित मांजरगाव गाठले असता जमलेल्या जमावातील मंडळीने काढता पाय घेत मोटर सायकली सोडून पळून गेले असता वीस ते पंचवीस मोटार सायकली पोलिसांनी ताब्यात घेऊन बदनापूर पोलीस ठाण्यात जमा केले व जखमींना रुग्णालयात दाखल केले तदनंतर रात्री उशिरा दोन्ही गटाकडून एकमेकांविरुद्ध तक्रारी दाखल करण्यात आल्या असून त्या तक्रारीत सदरचा वाद हा दोन शाळकरी लहान मुलांच्या भांडणावरून झालेला असल्याचे नमूद करण्यात आले.
रात्री उशिरा हल्लेखोरांपैकी चार जण पोलिसांनी ताब्यात घेतलेले असून अन्य आरोपींचा शोध व्हिडीओ चित्रीकरणावरून घेतला जात आहे,एकंदरीत पोलीस निरीक्षक मछिंद्र सुरवसे यांनी मांजरगाव येथील धार्मिक स्थळावरील भोंग्याचा वाद ८ आगस्ट रोजीच चांगल्याप्रकारे हाताळून संपुष्ठात आणलेला होता व संध्याकाळी दोन समाजातील वाद झाल्याने सर्वत्र धार्मिक स्थळाच्या मुद्द्यावरून वाद हल्ल्याची चर्चा सुरु झाली होती आणि त्यातूनच सर्वत्र बातम्या रंगल्या असल्या तरी गावात शांतात निर्माण करण्यात पोलीस निरीक्षक मछिंद्र सुरवसे यांना यश आलेले आहे हे विशेष !
मछिंद्र सुरवसे -पोलीस निरीक्षक बदनापूर
बदनापूर तालुक्यातील मांजरगाव येथे ८ आगस्ट रोजी सायंकाळी दोन समजत धार्मिक स्थळावरून वाद झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली असता आम्ही घटनास्थळी पोहचलो तेव्हा जमलेली मंडळी पळून गेली व चार जणांना आम्ही तब्यत घेतले तरी वीस ते पंचवीस मोटरसायकली सोडून पळून गेले त्यामुळे त्या मोटर सायकली ताब्यात घेण्यात आल्या असून सदर घटना दोन लहान शाळकरी मुलांच्या भांडणातून घडलेली असून कोणताही धार्मिक वाद नाही ,चुकीच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत, जो व्यक्ती कायदा हातात घेईल त्याच्या विरुद्ध पोलीस प्रशासन कडक भूमिका घेईल याची सर्वानी नोंद घ्यावी कोणाचीच जि केली जाणार नाही.









