बदनापूर (आदिल खान)
कर्जबाजारीपनाला कंटाळून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासनाच्या धनादेशाचे वाटप आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते बदनापूर तहसील कार्यालयात करण्यात आले. शासनाकडून, कर्जबाजारीला कंटाळून आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबीयांना, दारिद्रय रेषेखालील कमावत्या व्यक्तीचे मृत्युनंतर त्यांच्या वारसांना राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्यता योजना, तसेच नैसर्गिक आपत्ती वीज पडून मयत झालेल्यांच्या वारसांना मदत म्हणून शासनाच्या वतीने निधी वितरित करण्यात येतो,
दरम्यान बदनापूर तालुक्यातील मदतीचे धनादेश बदनापूर तहसील कार्यालयात आयोजित या धनादेश वाटपाप्रसंगी आमदारांनी वितरीत केले. कार्यक्रमाप्रसंगी, तहसीलदार अश्विनी डमरे, दिपक भैय्या ठाकूर, हरिश्चंद्र बाबा शिंदे, अनिलराव कोलते, भगवान मात्रे, विलास जऱ्हाड, पद्माकर जऱ्हाड, गणेश डोळस, भगवान बारगाजे, गोरखनाथ खैरे, संदीप पवार, बाळासाहेब काळे, बजरंग दादा वैद्य, तहसिलचे अधिकारी, कर्मचारी, मयत कुटुंबातील वारसदार, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते, यावेळी सदर कुटुंबाना कायमस्वरूपी आधार देण्यासाठी त्यांना विधवा निवृत्तीवेतन व शासनाच्या इतर योजनांच्या माध्यमातून मदत मिळवून देण्याच्या सूचना प्रशासनाला आमदार नारायण कुचे यांनी यावेळी केल्या हे विशेष.









