फलटण / अमिर शेख
शहरातील महाराष्ट्र शासन, केंद्र सरकार व विविध वैशिष्ट्ये पूर्ण योजना अंतर्गत आलेला निधी चे वाटोळे न. प्रशासन,मलिदा गँग चे काही सेवक व ठेकेदार यांनी संगनमताने आर्थिक युती करून काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वित्तीय अनियमितता करत न.प. च्या तिजोरी वर डल्ला मारत फलटण शहरातील जनतेची प्रचंड प्रमाणात पिळवणूक करण्यात यशवंत झाले आहेत.
यामुळे शहरात पायाभूत सुविधा, आरोग्य यंत्रणा व विविध विकासकामांचा निकृष्ट दर्जा खालावला आहे.
तेच तेच ठेकेदार, निकृष्ट दर्जाचे मटेरियल, बांधकाम विभागातील वरिष्ठ व कनिष्ठ नगर अभियंता, व्हिजन नसलेले प्रतिनिधी यामुळे २५-३० वर्षे झालीत तरी एक हि ठेकेदार काळया यादीत गेला नाही एवढी आपल्या कडील राजकीय व प्रशासकीय व्यवस्था परिवर्तनशील व प्रगल्भ आहे.
भविष्य मध्ये फलटण शहर व तालुक्यातील विकास प्रकल्प हे ओळबया मध्येच होतील व झाली पाहिजेत या करता कटाक्षाने लक्ष असणार…या बाबतीत वेळ प्रसंगी मा.अजितदादा पवार ( उप मुख्यमंत्री. म.रा ) यांच्या कडे पाठपुरावा केला जाईल.








