बदनापुर / प्रतिनिधी / शहरात गल्ल्या बोळांमध्ये तसेच शाईनगर व मुख्य रस्त्यांवरसुद्धा सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. जागोजागी साचलेल्या घाणीमुळे व चिखलामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. दोन वर्षातील नगर पालिकेच्या या ढिसाळ कारभारामुळे मात्र नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत.
बदनापुर नगर पालिकेचा कारभार कोणत्याही पक्षाकडे असो शहराची स्थितीत मात्र काहीच बदल दिसत नाही. सौ .मंगलताई जगन्नाय बारगाजे अध्यक्षपदी निवडल्यानंतर कांहीतरी बदल होईल अशा अपेक्षेने बदनापुरकर होत्या. मात्र, सौ बारगाजे यांच्या सत्तेचे नव्याचे नऊ दिवस संपल्यानंतर शहराची परिस्थिती पहिल्या सारखीच बकाल झाली आहे.







